रिपब्लिकन पक्षाचा निवडणुकीच्या इतिहासाचा सुवर्णकाळ :- आंबेडकर मूव्हमेंट

 रिपब्लिकन पक्षाचा निवडणुकीच्या इतिहासाचा सुवर्णकाळ :- आंबेडकर मूव्हमेंट 


१९५७ ते १९६७ पर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया  देशात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला विरोधी पक्ष होता.


संस्थापक:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर


स्थापना:- ३० सप्टेंबर १९५६(दिल्ली)


जाहिर घोषणा:- ३० ऑक्टोबर १९५७ (नागपूर)


१९५७ च्या निवडणुकीत निवडून आलेले पक्षाचे लोक प्रतिनिधी


लोकसभा :- १२ खासदार 

विधानसभा:- एकूण २९ आमदार

महाराष्ट्र (१६), पंजाब (५), मद्रास (३), कर्नाटक (२), आंध्रप्रदेश (१), गुजरात (१),

या आमदाराच्या सहकार्याने १९५८ ला बॅ.खोब्रागडे राज्यसभेत निवडून आले. 

पक्षाला मिळालेली एकूण मते २१ लाख ७३ हजार.


१९६२ च्या निवडणुकीत निवडून आलेले पक्षाचे लोक प्रतिनिधी


लोकसभा :- एकूण ३ खासदार 

विधानसभा:- एकूण २० आमदार उत्तरप्रदेश(१०), महाराष्ट्र(३), पंजाब(५) मध्यप्रदेश(१), आंध्रप्रदेश (१),

पक्षाला मिळालेली एकूण मते ३२ लाख २१ हजार.



१९६७ च्या निवडणुकीत निवडून आलेले पक्षा चे लोक प्रतिनिधी

लोकसभा :- एकूण १ खासदार 

विधानसभा:- एकूण २२ आमदार हरियाणा (२), महाराष्ट्र(५), पंजाब(३) कर्नाटक (१), आंध्रप्रदेश(२),बिहार(१), उत्तरप्रदेश (८),

पक्षाला मिळालेली एकूण मते ३६ लाख ७६ हजार.


अशाप्रकारे डॉ. बाबासाहेबांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष १९५७ ते १९६७ पर्यंत भारतात दुसऱ्या क्रमांकावर होता.


*THE REPUBLICAN*