डॉ.बाबासाहेबांनी अशी वाचवली मराठी भाषिकांची मुंबई...

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील अनेक प्रकारे कार्य केले आहे तरीही त्यावर नेहमी जास्त प्रकाश टाकण्यात आला नाही.अश्यातच आज आपल्या मुंबई महाराष्ट्राची असे थांब पणे मत मांडणारे एकमेव डॉ.बाबासाहेब आंबेडकर




मुंबई महाराष्ट्र राज्य पासून वेगळी करणे हे कृत्य योग्य नाही असे डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांचे ठाम मत होते.


मुंबई ही महाराष्ट्राचीचं आहे :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर


बाबासाहेबांनी १९४८,१९५३ आणि १९५५ साली या विषयावर संशोधनपर लेखन केले. ते इतके बिनतोड होते की गुजराती लॉबी आणि मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू पाहणारी,मुंबईला स्वतंत्र राज्य बनवा म्हणणारी मंडळी यांची बोलतीच बंद झाली. नेमका काय होता बाबासाहेबांचा हा युक्तीवाद?




बाबासाहेबांनी त्यांच्यासमोर नऊ प्रश्न उभे केले.


१. मुंबई कधीच महाराष्ट्रात नव्हती याला पुरावा काय आहे?

२. मुंबई मराठा राज्याचा हिस्सा नव्हती असे कशाच्या आधारावर म्हणता?

३. मराठी भाषकांची लोकसंख्या मुंबईत सर्वाधिक नव्हती असे कसे म्हणता येईल?

४. काय गुजराती हे मुंबईचे मूळचे रहिवासी आहेत की गुजरातचे?


५. मुंबई हे व्यापारी बेट असल्याने ते एकट्या महारष्ट्राचे नाही तर ते सर्व भारताचे आहे या म्हणण्यात कितपत तथ्य आहे?

६. मुंबईचा व्यापार-उदीम गुजरात्यांनी उभा केलाय, मराठी लोक हे फक्त हमाल आणि कारकून आहेत, म्हणून मुंबईला महाराष्ट्रात घालू नये हा दावा किती टिकाऊ आहे?

७. मुंबईच्या कमाईवर, नफ्यावर जगता यावे, आयते खाता यावे यासाठी महाराष्ट मुंबईवर दावा करतोय हे खरे आहे काय?

८. बहुभाषिक राज्य चांगले असते कारण तिथे अल्पसंख्यक भाषकांना अभय असते हे बरोबर आहे काय?


९. राज्यांची पुनर्रचना रॅशनल असावी, नॅशनल नको हा दावा योग्य आहे काय?


याची उत्तरे देताना बाबासाहेबांनी इतिहास आणि भुगोल असे दुहेरी पुरावे समोर ठेवले होते.


प्रा.हरी नरके..


भौगोलिक उत्तरे अश्याया प्रकारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केली.

Look what I shared: प्रा. हरी नरके @MIUI| https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR29ma5RNcgebrVmr9cM75iGgKTKyXSoTfHumLSmSQg0GKhysH-K23cC6AU