डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची हत्या माईनी केलीय का...?

🎯 *काय खरं आणि काय खोटं..?*🎯

डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा दुसरा विवाह *१५ एप्रिल १९४८* रोजी डाॅ.शारदा कबीर (सविता भीमराव आंबेडकर) यांच्याशी झाला. *बाबासाहेबांच्या निर्वाणाविषयीचे गूढ अजूनही उलगडले नाही.* बाबासाहेबांची प्रकृती जेव्हा खूपच खालावत चालली होती. *(फेब्रुवारी १९५६)* या काळात बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांचा व इतर लोकांचा सवितामाईंकडे बघण्याचा दृष्टिकोन द्वेषाचा होऊ लागला होता. याची काही कारणे असतीलही. ( *१९५०* नंतरच्या काळात सवितामाईंविषयी लोकांचा द्वेषभावनेचा दृष्टिकोन दृढ होत गेला.)
              अलीकडच्या काळात एक लेखक महाशय त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात सवितामाईवर बाबासाहेबांच्या हत्येचा आरोप करतात. एखादी गोष्ट जर सिध्द करायची असेल तर ती प्रत्येक वेळी *तर्काच्या* आधारावरच सिध्द होत नाही तर त्यासाठी *भक्कम पुरावा* असावा लागतो.
              याबाबतीत माझ्यासारख्या वाचकाला काही प्रश्न पडतात. बाबासाहेब व शारदा कबीर यांचा विवाह *१९४८* साली झाला. *१९४८ नंतर बाबासाहेबांनी केलेल्या अनेक कार्यांपैकी काही महत्वपूर्ण कार्य पुढीलप्रमाणे:-*

👉 *हिंदू कोडबील*
👉 *The untouchable* हा ग्रंथ लिहिला.
👉 *भारताची राज्यघटना निर्मिती.*
👉दिल्लीत *आंबेडकर भवन*ची कोनशिला बसविली.
👉 *पीपल्स एज्युकेशन सोसायटीतर्फे काॅलेज उभारणी.*
👉 *बुध्द उपासना पाठ* ही बुध्द वंदनेची पुस्तिका प्रकाशित केली.
👉 *मुंबईतून राज्यसभेवर बाबासाहेबांची निवड.*
👉मुंबईत *सिध्दार्थ काॅलेज आॅफ काॅमर्स अॅण्ड इकाॅनाॅमिक्स* सुरु केले.
👉रंगून, ब्रम्हदेश येथे जागतिक *बौध्द परिषदे*साठी गेले.
👉 *परराष्ट्रीय धोरणाविषयी विचार* मांडले.
👉 *देहू रोड* (जि.पुणे ) येथे *बुध्द विहाराचे उद्घाटन* केले.
👉 *भारतीय बौध्द महासभा (दि बुध्दिस्ट सोसायटी आॅफ इंडिया)* या संस्थेची त्यांनी मुंबईत स्थापना केली.
👉 *मुंबई राज्य कनिष्ठ गावकामगार असोसिएशन* या संस्थेची स्थापना त्यांनी मुंबईत केली.
👉 *थाॅट्स आॅन लिंग्विस्टिक स्टेट्स* हा डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ प्रकाशित झाला.
👉 *जनता पञाचे प्रबुद्ध भारत असे नामकरण केले.*
👉 *भारतातील लोकशाहीचे भवितव्य* या विषयावर बाबासाहेबांनी भाषण केले.
👉 *मुंबईत विधी महाविद्यालय सुरु केले.*
👉 *आंबेडकर स्कूल आॅफ पाॅलिटिक्स* या संस्थेची स्थापना केली.
👉 *नागपूर येथे बाबासाहेबांनी आपल्या पत्नीसह बौध्द धम्माची दीक्षा घेतली. व लाखो अनुयायांना बौध्द धम्माची दीक्षा दिली.*
👉 *बुध्द आणि त्याचा धम्म* हा ग्रंथ लिहिला.
👉 *बुध्द आणि कार्ल मार्क्स* हा ग्रंथ लिहिला.
👉 *क्रांती आणि प्रतिक्रांती हा ग्रंथ लिहिला.*

जर सवितामाईंना बाबासाहेबांची हत्या करायचीच असती तर त्यांनी वरील सगळी महान कार्ये बाबासाहेबांच्या हातून होण्याआधीच त्यांची हत्या केली असती........नाही का????
या प्रश्नाचे उत्तर माझ्यासारख्या वाचकांसाठी *अनुत्तरितच* राहते.

माईसाहेब आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे जे योगदान आहे ते मान्य करायला हवे. त्या बाबासाहेबांच्या जीवनात आल्या, त्यांनी बाबासाहेबांची काळजी घेतली म्हणून बाबासाहेब काही वर्षे जगू शकले. १९४८ च्या नंतर बाबासाहेबांनी केलेल्या कार्याचे  काही श्रेय माईसाहेबांना नक्कीच देता येईल....नाही का??

वाचकांनी *डोळसपणे वाचन* करावे. कोणाच्याही बोलण्यावर, लिखाणावर सहजपणे डोळे झाकून विश्वास ठेवू नका.

*महत्वाची टिप्पणी:-* १९४८ पासून बाबासाहेबांच्या जीवनात त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी सवितामाई नसत्या तर कदाचित बाबासाहेबांच्या हातून वरील सर्व महत्त्वपूर्ण कार्ये पूर्ण झालीच नसती....!

*भावनिक न होता, विचार करा.*

लेखन:-
सुरज प्रकाश तळवटकर®✍
क्रांतीभूमी
Whatsapp No:-9987662373
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel