व्हिडीओ- मुस्लिम मुलगा मंदिरात पाणी पियाला गेला म्हणून मारहाण
जातीव्यवस्था,धर्मभेद, लिंगभेद, अश्या अनेक घटना घडत असतात. पूर्वी अस्पृश्यांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. येथील शोषिक वर्गाचा उद्धार करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुध्दा पाण्यासाठी जगातील सर्वांत मोठा सत्याग्रह केला होता. महाड सत्याग्रह इतिहासात हा सगळ्यात मोठा सत्याग्रह मानला जातो. आज देश आपण विज्ञान युगात जगत असताना ही एकमेकांच्या धर्म, जात ,लिंग यांकडे बघून भेदभाव करत असतो.
त्या लहान मुलाला तहान लागली म्हणून तो मंदीरात पाणी पियाला गेला त्याला समोरील व्यक्तीने त्याच नाव असिफ असे नाव सांगताच त्या लहान मुलाला सादर व्यक्तीने मारहाण करण्यास सुरुवात केली. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होतांना दिसत आहे. खरंच काय आज आपण 21व्या शतकात जगत आहोत का..? पाणी ही नैसर्गिक देणगी आहेच सोबत पाणी हेच जीवन आहे. अश्या या मानसिकता मानवी जीवनातील अमूल्य असणाऱ्या गोष्टी कधी धर्म जाती सोडून एक मानवतावादी दृष्टीने कधी बघतील ..?


Leave Comments
Post a Comment