लॉकडाउन व जातीवाद
Sunday, 7 June 2020
0
लॉकडाउन व जातीवाद.
पुरोगामी महाराष्ट्रमध्ये जर सत्ता परिवर्तन होऊन सुद्धा मागास किंवा दलित समाजावर अन्याय अत्याचार होत असेल तर ते लांच्छनास्पद आणि लाजिरवाणी बाब आहे , कारण महाविकास आघाडीत काम करणारे नेते , पदाधिकारी , कार्यकर्ते ऊठसूट छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू ,आंबेडकर यांचे नाव घेत राजकारण आणि समाजकारण करत असतात .जर असे असेल तर या पक्षासोबत काम करणाऱ्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी , समाज घटकांनी आणि तथाकथित विचारवंतांनी याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे, कारण जातीयवादी प्रकरने फक्त बीजेपीच्या राज्यात घडत होते असे नाही , तर प्रस्थापित पक्षांच्या विचारात व जाणिवेत सामंतशाही व वर्चस्ववादी भूमिका असेल तर सामाजिक न्याय येणार कुठून ???
गेले काही दिवस महाराष्ट्रात लॉकडाउन लागू झाल्यानंतर अनेक जातीवाद आणि अन्याय अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत , ज्यात बीड जिल्ह्यातील पारधी हत्याकांड , अरविंद बनसोडे प्रकरण , खंडू साळवे वर झालेला हल्ला , भीमराव गायकवाड प्रकरण हे सर्व पाहता जातीवाद लोक कोरोना आणि लॉकडाउन ही मागास व दलित विरोधी काम करण्याची संधी म्हणून पाहतात ??? असा प्रश्न निर्माण होतो .
कारण मागील काही दिवसात रिपोर्ट झालेल्या या घटना आहेत , या मध्ये ज्या केसेस रिपोर्ट झाल्या नसतील तर त्याची काय अवस्था असेल याची कल्पना न केलेली बर . जर एखाद्या जातीवाद प्रकरणात कोणत्याही मंत्र्यांचे संबंध जोडला जात असेल , तर त्या संबंधित मंत्र्यांची नैतिक जबाबदारी बनते की अशा प्रकरणामध्ये पुढे येऊन खुलासा केला पाहिजे , नाहीतर समाज म्हणून संशयाची सुई त्यांच्याकडे जाऊ शकते नाही ???
महाराष्ट्र शासनाने या सर्व प्रकरणात तातडीने लक्ष घालून संबंधीत जबाबदार लोकांवर कायदेशीर कारवाई करावी , तसेच यांना पाठीशी घालणाऱ्या लोकांना ही सहआरोपी म्हणून दोषी धरण्यात यावे , कारण कोणाचा वरदहस्त असल्याशिवाय कोणी अशी हिम्मत करत नाही , जर हे सरकार सर्व सामान्य जनतेचे , गरीब , आदिवासी , मागासवर्ग , शेतकरी , कामगार , कष्टकरी यांचे प्रतिनिधित्व करणारे असेल , तर त्यांनी आपल्या कृतीतून महाराष्ट्राला आश्वाशीत करावे , जेणेकरून जनतेला संदेश जाईल हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा फुले , शाहू महाराज , डॉ.आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांचा विचारांवर आणि वारसा लाभलेले सरकार आहे , तर त्यांनी महाराष्ट्र मध्ये समान न्याय व सामाजिक न्याय याची बीज खालपर्यंत रुजवली तर जनतेचे विश्वास निर्माण होईल , अन्यथा सर्व एकाच मालेचे मणी ही म्हणण्याची वेळ जनतेवर येऊ नये.
सुनील शिरीकर
(टीप :- लेखकांनी वरील सध्या महाराष्ट्र मध्ये घडणाऱ्या गोष्टींचे वर्णन केले,वरील लेखाशी आंबेडकर मोव्हमेंट टीम सहमत असेल असे नाही,)
पुरोगामी महाराष्ट्रमध्ये जर सत्ता परिवर्तन होऊन सुद्धा मागास किंवा दलित समाजावर अन्याय अत्याचार होत असेल तर ते लांच्छनास्पद आणि लाजिरवाणी बाब आहे , कारण महाविकास आघाडीत काम करणारे नेते , पदाधिकारी , कार्यकर्ते ऊठसूट छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू ,आंबेडकर यांचे नाव घेत राजकारण आणि समाजकारण करत असतात .जर असे असेल तर या पक्षासोबत काम करणाऱ्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी , समाज घटकांनी आणि तथाकथित विचारवंतांनी याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे, कारण जातीयवादी प्रकरने फक्त बीजेपीच्या राज्यात घडत होते असे नाही , तर प्रस्थापित पक्षांच्या विचारात व जाणिवेत सामंतशाही व वर्चस्ववादी भूमिका असेल तर सामाजिक न्याय येणार कुठून ???
गेले काही दिवस महाराष्ट्रात लॉकडाउन लागू झाल्यानंतर अनेक जातीवाद आणि अन्याय अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत , ज्यात बीड जिल्ह्यातील पारधी हत्याकांड , अरविंद बनसोडे प्रकरण , खंडू साळवे वर झालेला हल्ला , भीमराव गायकवाड प्रकरण हे सर्व पाहता जातीवाद लोक कोरोना आणि लॉकडाउन ही मागास व दलित विरोधी काम करण्याची संधी म्हणून पाहतात ??? असा प्रश्न निर्माण होतो .
कारण मागील काही दिवसात रिपोर्ट झालेल्या या घटना आहेत , या मध्ये ज्या केसेस रिपोर्ट झाल्या नसतील तर त्याची काय अवस्था असेल याची कल्पना न केलेली बर . जर एखाद्या जातीवाद प्रकरणात कोणत्याही मंत्र्यांचे संबंध जोडला जात असेल , तर त्या संबंधित मंत्र्यांची नैतिक जबाबदारी बनते की अशा प्रकरणामध्ये पुढे येऊन खुलासा केला पाहिजे , नाहीतर समाज म्हणून संशयाची सुई त्यांच्याकडे जाऊ शकते नाही ???
महाराष्ट्र शासनाने या सर्व प्रकरणात तातडीने लक्ष घालून संबंधीत जबाबदार लोकांवर कायदेशीर कारवाई करावी , तसेच यांना पाठीशी घालणाऱ्या लोकांना ही सहआरोपी म्हणून दोषी धरण्यात यावे , कारण कोणाचा वरदहस्त असल्याशिवाय कोणी अशी हिम्मत करत नाही , जर हे सरकार सर्व सामान्य जनतेचे , गरीब , आदिवासी , मागासवर्ग , शेतकरी , कामगार , कष्टकरी यांचे प्रतिनिधित्व करणारे असेल , तर त्यांनी आपल्या कृतीतून महाराष्ट्राला आश्वाशीत करावे , जेणेकरून जनतेला संदेश जाईल हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा फुले , शाहू महाराज , डॉ.आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांचा विचारांवर आणि वारसा लाभलेले सरकार आहे , तर त्यांनी महाराष्ट्र मध्ये समान न्याय व सामाजिक न्याय याची बीज खालपर्यंत रुजवली तर जनतेचे विश्वास निर्माण होईल , अन्यथा सर्व एकाच मालेचे मणी ही म्हणण्याची वेळ जनतेवर येऊ नये.
सुनील शिरीकर
(टीप :- लेखकांनी वरील सध्या महाराष्ट्र मध्ये घडणाऱ्या गोष्टींचे वर्णन केले,वरील लेखाशी आंबेडकर मोव्हमेंट टीम सहमत असेल असे नाही,)
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment