छोट्या संघटनांच्या अस्तित्वातुन कोसळणारे धृविकरण.:-मा.मार्शल विमलसूर्य चिमणकर

बेशिस्त घरंगळत जाणा-या व्यक्तित्वांनी आपल्या अस्तित्वाच्या उभारणी करिता छोट्या-छोट्या संगठनांचे एक जंगलच उभे केले आहे. या छोट्या-छोट्या संगठनांनी उभ्या केलेल्या जंगलात आंबेडकरी आंदोलनाकरीता उपयोगी पडणारी बरिच मंडळी हरवुन गेली आहेत. सामाजिक परिवर्तनाच्या गतिमानते करिता छोट्या छोट्या संगठनांचे योगदानही अनमोल ठरु शकते. पण त्याकरिताही प्रगल्भतेची नित्तांत गरज आहे.



...ही जी अवस्था लहान-लहान संगठनांना जन्म देते त्या अवस्थेत तरुणांना त्यांच्या राजकिय हक्कांची हवी तशी जाणिव नसल्यामुळे आपल्या एकंदरीत प्रवाहाच्या बाहेर उभे राहण्याचा प्रयत्न करणारे हे तरुण प्रस्थापित प्रतिगाम्यांच्या संघटना सहजपणे आपल्या जाळ्यात ओढुन घेतात. या अशा तरुणांच्या आकांक्षांचे फलित शुन्य तर असतेच सोबत आंबेडकरी आंदोलनात सक्रिय आंदोलनाकरीता अत्यंत महत्वाची उर्जा आपल्या सोबत असलेले हे तरुण इकडे तिकडे बर्बाद होतात. शेवटी दलितांचे नेते एकत्र राहिले असते तर असे झाले नसते, तसे झाले नसते असे म्हणत आपल्या अपराधांना झाकुन घेत... हे सततच घडत आहे. हे थांबविण्याची नित्तांत गरज आहे.


स्मृति.मा.मार्शल विमलसूर्य चिमणकर सर

(दि पिपल, धम्मक्रांती दिन विशेषांक -ऑक्टोबर १९९१)

Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel