डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दुसरे लग्न का केले..? आणि तेही ब्राह्मण मुलीशीच का केले.?


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी उतरत्या वयामध्ये अतिशय गंभीर पणे सेवा करणाऱ्या डॉ.सविता आंबेडकर यांना हिमालयाची सावली अशी उपाधी ही दिली गेलेली आहे.
आज 15 एप्रिल याच रोज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले   दुसरे लग्न( विवाह) केले होते.
आज समाजातील काही  व्यक्ती सविता  माई यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या हत्यारी  सुद्धा बोलतात. आणि आजची समाजाने त्यांना कधीही जास्त प्रमाणात स्वीकारले नाही.तरीही आज शिक्षित समाज डॉ.सविता आंबेडकर यांना स्वीकारू लागला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दुसरे लग्न का केले आणि नसते केले तर त्याचा परिणाम काय झाला असता याबद्दल आपल्याला थोड्यात माहिती देणार आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांनी  दुसरे लग्न का केले..?

माझ्या बाबतीत सांगावयाचे तर मी दिल्लीला आजारी अवस्थेत गेलो आणि त्याच अवस्थेत परत आलो . आजच डॉक्टर मंडळींनी माझी प्रकृती तपासली . त्यांनी रक्ताची तपासणी केली . माझी प्रकृती ची  तपासणी केली. त्यायां माझ्या प्रकृती ची भीती वाटली, अर्थात याची आपण चिंता करू नये . पडत्या काळात मी सावरून आहे . आपल्या समाजाला जोपर्यंत माझ्या अस्तित्वाची आवश्यकता आहे . पर्ययँ मी जगेन अशी खात्री वाटते. माझा हा दृढ आशावाद मला माझ्या कमकुवत प्रकृतीमळे निर्माण झालेल्या निराशेतन सांभाळतो . त्याचबरोबर मी परमेश्वराला अशी प्रार्थना करतो की अधिक नसले तरी आवश्यक तेवढे आयुष्य मला  दे..!

दुसरी गोष्ट माझ्यासंबंधीची आहे . माझे मित्र व वैद्यकीय सल्लागार यांनी निश्चितपणे मला असे सांगितले की , माझी या मधुमेहाच्या विकारापासून निकोप हाण्याची मोठी शक्यता आहे . पण जर का तो रोग उलटला तर धोकादायक आहे . मधुमेहाचा आजार हा खाण्यापिण्यावर अवलंबून असणारा आजार आहे . माझ्या दैनंदिन भोजनाची ( जेवण्याची ) व इन्सोलिन इंजेक्शन वगैरेबाबत काळजी घेणारे कोणी नसेल , तर हा आजार उलट उचल खाणार नाही असे मुळीच सांगता येणार नाही . माझ्या त्या मित्राचे असे म्हणणे की , जर माझी लग्न करण्याची तयारी नसेल तर मी एखादी शुश्रूषेसाठी नर्स ( परिचारिका ) किंवा घरदार सांभाळणारी बाई पाहावी . या गोष्टीचा मी फार काळ विचार करीत आहे . शुश्रूषेसाठी एखादी नर्स वा घर सांभाळणारी एखादी बाई घरी ठेवल्याने लोकांच्या मनात शंका - कुशंका निर्माण होतील . याचकरिता ' लग्न करणे ' हा अधिक चांगला मार्ग आहे . चि . यशवंताच्या आईच्या मृत्यूनंतर लग्न करावयाचे नाही असा माझा निश्चय होता . परंतु प्राप्त परिस्थितीत मजवर माझा निश्चय मोडण्याची पाळी आलेली आहे . डॉक्टर स्पष्टपणे म्हणतात की , लवकर मरणे किंवा लग्न करणे यातून कोणती तरी एक गोष्ट करणे भाग आहे . यासाठी माझ्या पसंतीनुरूप पत्नी मिळणे अशक्य नसले तरी अवघड आहे . माझी सौभाग्यवती होणारी स्त्री सुशिक्षित असली पाहिजे , तसेच ती डॉक्टरकीचा व्यवसाय करणारी असली पाहिजे व त्याचबरोबर स्वयंपाकपाण्यात चांगलो हुशार असली पाहिजे . या गोष्टींचा विचार करता आपल्या समाजात या तिन्ही गुणांनी युक्त व माझ्या वयाला अनुरूप अशी एखादी स्त्री मिळणे अशक्य कोटीतली गोष्ट आहे . तसेच इतर दुसऱ्या समाजातही माझे काही संबंध नसल्याने माझ्याशी लग्न करावयास अशी स्त्री मिळणेही अवघड दिसते . लग्न पुढे ढकलले तर ह्याविषयी लोकांत दिवसेंदिवस जास्त बभ्रा होईल आणि दुष्ट लोक माझी बदनामी करावयास ती एक मोठी पर्वणीच साधतील , अशी मला भीती वाटते . ही गोष्ट करण्यात मी काही नैतिक गुन्हा करीत आहे , असे मला वाटत नाही . तक्रार करायला मी कोणतीही जागा ठेवलेली नाही . यशवंतलासुद्धा नाही . त्याला मी आजपर्यंत सुरत तीस हजार रुपये दिले असून कमीत कमी ऐंशी किंमतीचे घरही दिले आहे . माझी खात्री आहे की , कुठल्याही बापाला आपल्या मुलाकरिता जे करता येईल त्यापेक्षा मी माझ्या मुलाकरिता जास्त केले आहे !

माझी प्रकृती एकाएकी ढासळली आहे आणि दुखण्याने फिरून उचल खाल्ली आहे . चार दिवस डोळ्याशी डोळा लागलेला नाही . पायातील वेदना तर असह्य होत आहत . रात्रभर जागरण करून नोकरांना माझी सेवा करावी लागली . दिल्लीतील दोन नामांकित वैद्यांनी मला तपासले . त्यांचे मत असे पडले की जर पायांतील वेदना त्वरित थांबल्या नाहीत , तर त्या वेदना नेहमीच राहतील आणि कधीच बऱ्या होणार नाहीत . माझ्या प्रकृतीची काळजी घ्यायला कोणीतरी माणूस पाहिजे , या तुमच्या सूचनेचा मी पूर्वीपेक्षा अधिक आस्थेने विचार करीत आहे . _ माझे जीवन इतके एकलकोंडे ( एकाकी ) झाले आहे की त्यामुळे अस्पृश्य हिंदू पुरुष व स्पृश्य हिंदू स्त्रिया यांच्याशी माझे मुळीच संबंध नाहीत . पण सुदैवाने माझ्या पसंतीची एक महिला आहे . ती सारस्वत ब्राह्मण जातीची आहे . ता . १५ एप्रिल रोजी दिल्ली येथे तिच्याबरोबर लग्न होईल . मी ११ तारखेस दिल्लीला आलो . मला थोडेसे बरे वाटत असले तरी अजूनही अशक्तपणा फारच जाणवतो . माझ्या प्रकृतीत सुधारणा दिसत नाही . मी दिल्लीत फारच आजारी होतो . ता . ३ चा रविवार हा जिवावरचा दिवस निघून गेला . हल्ली मी जरा ठीक आहे . मी हल्ली कामही करू शकत नाही व बाहेर पडूही शकत नाही .

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

संदर्भ:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात "असा मी घडलो"
लेखक:- ज.गो.सन्त
संकलन :- बुद्धभूषन गवई

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची हत्या माईनी केलीय का...? | https://www.ambedkarmovement.com/2019/07/blog-post_15.html

Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel