डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान

डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान

 डॉ . बाबासाहेब आंबेडकर , म्हणजे दलितांचे मसीहा किंवा जास्तीत जास्त संविधान निर्माते अशाप्रकारे अत्यंत संकुचित दृष्टिकोनातून त्यांच मूल्यमापन केलं जातं . बऱ्याचवेळा जाणीवपूर्वक सुद्धा पसरवले जाते , परंतु डॉ . बाबासाहेबांचं एकूण कार्य जर बारकाईने पाहिले तर लक्षात येतं की डॉ . बाबासाहेबांचं कार्य हे एक राष्ट्र निर्माणाचं अतुलनीय काम आहे . त्यांनी भारतातील सगळ्या समूहांच्या कल्याणाचा आणि मानवी मूल्यांचा विचार मांडला आहे . त्यांच्या कार्यातून महिलांच्या न्याय हक्कांचा आणि प्रतिनिधीत्वांचा मुद्दा त्यांनी अग्रक्रमाने उचलून धरल्याचे आढळते . महिलांच्या सर्व न्याय हक्कासाठी त्यांनी मंत्रिपदाचा सुद्धा त्याग केला भारतीय समाजाने आणि प्रामुख्याने महिलांनी विसरता कामा नये . खरं तर डॉ . बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व बहआयामी आहे ग्रंथकार , जागतिक दर्जाचे तत्वज्ञ , शिक्षणतज्ज्ञ , समाज शास्त्रज्ञ अर्थतज्ञ , कायदे पंडित , स्री उद्धारक , निर्भीड पत्रकार उर्जातज्ज्ञ आशा अनंत कौशल्याने राष्ट्रनिर्माणाचे त्यांचे काम एक छोटया लेखाद्वारे मांडणे हे कठीणच आहे . आपल्याकडे काही विशिष्ट लोकांकडून ज्यांचा स्वातंत्र्य लढ्यात कोणत्याही प्रकारचा सहभाग नव्हता , नाही असे लोक भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदाना बद्दल कुजबुज मोहीम राबवून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा बालिश प्रयत्न करताना आपण पाहत असतो . यातच ज्यांचा अभ्यास नाही . ज्यांना इतिहास माहित नाही असे समार बुद्धी असणारे लोक सोशल मीडियातील खोट्या संभ्रमित करणाया माहितीवरून मत बनवून टाकतात . आणि एका अपप्रचाराचे बळी ठरतात .
साकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या आपल्याकडे काही विशिष्ट लोकांकडून ज्यचा स्वातत्र्य लढ्यात कोणत्याही सहभाग नव्हता , नाही असे तोक भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब यी स्वातंत्र्य लढ्यातील योगदाना बद्दल कुजबुज मोहीम राबवून लोकांच्या मनात संभा सतो यातच ज्यच अभ्यास नाही . ज्यांना करण्याचा बालिश प्रयत्न करताना आपण पाहत असतो . यातच ज्यांचा अभ्यास इतिहास माहित नाही असे सुमार बुद्धी असणारे सोशल मीडियातील खोलता करणाया माहितीवरून मत बनवून टाकतात . आणि एका अपप्रचाराचे बळी ठरतात . स्वातंत्र्यपूर्व भारत अर्थात ब्रिटीशांचे आगमन ईस्ट डडकंपनीच्या माध्यमातून इंग्रज भारतात आले . व्यापार करण्यासाठी इथल्या राज्यकर्त्यांकडून आवश्यक ते परवाने घेऊन त्यांनी वखारी स्थापन केल्या व्यापाराच्या निमिताने अनेक राज्यकर्त्यांच्या संपर्कात आल्याने देशाचं राजकीय चरित्र त्यांनी लवकरच ओळखले हळूहळू इथलं सामाजिक जीवन , चालीरीती , परंपरा यांचा अंदाज घेतला आणि या निष्कर्षापर्यंत पोहचले की आपण इथली सत्ताव बळकावू शकतो . सिराजउद्दौला हा त्या काळचा बंगालवा शक्तिशाली नवाब होता इंग्रजाच्या हालचाली वरून तशी शंका आली . परंतु तो पर्यत त्याचा सेनापती मीर जो नवाद बनण्याच्या महत्वाकांक्षेने इंग्रजांना दिला गेला प्लासीच्या लढाईत आपल्या मोठ्या सैन्य संख्यने इंग्रजांना येऊन मिळाला आणि या फंट फितुरीने नवाबाचा पराभव झाला . अशा प्रकारे भारताच्या सत्ताकारणात इंग्रजांचा चा प्रवेश झाला . पुढे डलहौसीन साम्राज्य विस्तार करून संपूर्ण देश इंग्रजांच्या अंमलाखाली आणला . १८५७ च्या उठवानंतर इथल्या सत्तेवर पकड मिळवण्यासाठी राणीचा जाहीरनामा आला आणि कंपनी सरकार जाऊन संपूर्ण भारतीय लोक राणीचे प्रजाजन झाले . सत्तेच्या सर्व चाव्या ब्रिटिश पार्लमेंटच्या हातात आल्या पुढे विसाव्या शतकापर्यंत सर्व शांत होते . दरम्यान १८८५ साली काँग्रेसची स्थापना झाली . परंतु त्यांनी सरकारशी सहकार्याचे धोरण स्वीकारले धोरण एवढं मवाळ होते की जणू एतद्देशीयांना आवाज मिळावा म्हणून इंग्रजांनीच काँग्रेस स्थापन केली की काय असं वाटावं !



राज्यकारभार सुरळीत चालावा म्हणून १८९२ साली इंडियन कौन्सिल अॅक्ट ने प्रथमच भारतीयांना नॉमिनेशन पद्धतीने कायदे कौन्सिल नध्ये लोकांच प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि आधुनिक राष्ट्राची पायाभरणी झाली . भारत देश म्हणून उदयास येत असतना । नेते मात्र अपरिपक्व होते . स्वातंत्र्यानंतर भारत देश कसा असेल . हे स्वातंत्र्य दीर्धकाठ कसे । टिकेल , इथल्या प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य उपभोगण्याची संधी मिळेल का ? इथली समाज व्यवस्था राष्ट्रनिर्मिती साठी परिपक्व आहे का ? या प्रश्रावर किती लोक गंभीर होते . हा । संशोधनाचा प्रशु आहे . भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रीयत्वाची । संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे . वर्षानुवर्षे येथील समाजातस्था आणि धर्मव्यवस्था एकच होती . किबहुना ती धर्माच्या अधिपत्याखाली होती त्यामळे समाजव्यवस्थेवर धर्माचा पूर्णपणे पगडा होता भगवान गौतम बुद्धांच्या काळापासून या समाजव्यवस्थेला हादरे बसू लागले पुढे । महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाज व्यवस्था बदलण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना । केली परंतु या धर्माला मूर्त स्वरूप देण्यात व्यवस्थेने अडचणी आणल्या हॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना चातुर्वणावर आधारित समाजव्यवस्था मन्य नव्हती त्याऐवजी सर्व माणसे एक समान आहेत आणि त्याना त्याचे न्याय हक्क अधिकार मिळाले पाहिजे जन्माने कोणाचे श्रेष्ठत्व ठरत नाही . अशी त्यांची तळमळ होतो . भारतात जन्माने कुणाचेही श्रेष्ठत्व ठरत नसून कर्तत्वाने ठरते यावर त्यांचा दृढ विश्वास । होता त्यामुळे हिंदू धर्म ही एक पायरी नसलेली उतरंड असल्याचे ते सांगत या उलरडीमध्ये परिवर्तनाला जागा नव्हती त्यामुळे बाबासाहेबांनी हिंदू धर्म सुधारणेचे आटोकाट प्रयत्न केले परंतु वारंवार केलेल्या सुधारणावादी अदोलनानंतरही हिंदू धर्म बदलत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी येवला मुक्कामी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही अशी घोषणा केली आणि तब्बल एकवीस वर्षाच्या विचारमंथनानंतर बुद्धांचा कल्याणकारी धम्म स्वीकारला डॉ . बाबासाहेबांनी आपल्याला आपल्या हयातीत राष्ट्राला सर्वोच्च प्राधान्य दिले होते . मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतः भारतीयच असा त्यांचा उदघोष होता त्याचवेळी महात्मा गांधी मात्र मी प्रथम भारतीय आहे आणि नंतर हिंदू आहे असे म्हणताना आपल्याला दिसतात यातून दोघांच्या राष्ट्राकडे बघण्याच्या दृष्टिकोनातील फरक लक्षात यावा माझा समाज आणि राष्ट्र यातून एकाची निवड करायची झाल्यास मी राष्ट्राला प्रथम पसंती देईल असे डॉ . बाबासाहेब मानत असत ज्या समाजाच्या कल्याणासाठी ते अहोरात्र झटत होते ते समाजाच्या हितापेक्षा राष्ट्रप्रेमासाठी तडजोड करण्याची त्यांची तयारी होती त्यांना धर्म भाषा जात या कोणत्या घटकांपासून राष्ट्रीयत्व विचलित होणार नाही अशी प्रखर देशभक्ती हवी होती अनेक मंडळी डॉ . बाबासाहेबांचे सतत स्वातंत्र्य लढ्याबद्दल आक्षेप घेतात त्यांनी स्वातंत्र्यासाठी तुरुंगावास भोगला का असा खोडसाळ प्रश्न उपस्थित केला जातो . परंतु स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास आवश्यक आहे का किंवा देशभक्तीसाठी तुरुंगवास हाच एकमेव निका आहे का याबद्दल कोणी फारशी चर्चा करताना दिसत नाही डॉ . बाबासाहेबांसमोर स्वातंत्र्याचे दुहेरी आहान होते एकीकडे विषमतावादी हिंदू धर्माच्या अक्राळविक्राळ जोखडातून तमाम शोषित तचित अस्पृश्य समाजाला मुक्त करून त्यांना माणूस म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी लढायचे होते संघर्ष करून त्यांना त्यांचे मुलभूत हक्क प्रदान करायचे होते .
या संघर्षात तत्कालीन समाजव्यवस्था त्यांच्या विरोधात उभी होती त्यामुळे या सरकारकडून समाजासाठी काही हक्कांना मागून घ्यायचे होते गोलमेज परिषदेत अस्पत स्वतंत्र मतदारसंघाचा हक्क मिळाल्यानंतर जी परिस्थिती उद्भवली ती लक्षात घेतली हॉ बाबासाहेबांची कोंडी कोणालाही लक्षात येईल . तर दुसरीकडे त्यांना इंग्रजांच्या तावडीतन भारताला स्वतंत्र कसे करता येईल आणि आपले स्वताच सरकार स्थापन कसे करता येईल या गोष्टींसाठी ते संघर्ष उभा करत होते हे दिसेल . एकीकडे काँग्रेससारखी प्रबळ राजकीय शक्ती विरोध करत आहे तर दुसरीकडे डंपल सरकारही सनदशीर भांडत आहे . अशा परिस्थितीमध्ये डॉ . बाबासाहेबांना तुरुंगास परवाणा होता का ? याचाही विचार झाला पाहिजे . डॉ . बाबासाहेबांचा संपूर्ण समाज त्यांच्या एका मादाखातर जीव देण्यासही तयार होता ज्या देशाला राष्ट्रीयत्वाची ओळख नव्हती त्या देशात सर्व नागरिकांना राज्यघटनेच्या माध्यमातून भारतीयत्वाच्या सूत्रात बांधण्याचे फार मोठे काम डॉ . बाबासाहेबांनी केलेले आहे . डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे होते की ग्रिटिशांकडून राजकीय स्वातंत्र्य आपण मिळवू पण भारतातील विषमतावादी सामाजिक रचनेमुळे सामाजिक स्वातंत्र्य कसे मिळणार त्याचा विचारही आपल्याला करावा लागणार आहे . अन्यथा मिळालेल्या राजकीय स्वातंत्र्याचा फायदा सर्वांना होणार नाही या डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा काँग्रेस पढायांनी विचारच केला नाही . त्यामळे डॉ . आंबेडकरांचे काँग्रेसच्या पढान्यांचे वैचारिक मतभेद झाले हे जरी खरे असले । तरी ब्रिटिशांच्या मायभूमीत झालेल्या तिन्ही गोलमेज परिषदांमध्ये डॉ . आंबेडकरांनी ठामपणे व अभ्यासपूर्ण मांडलेली स्वराज्याची भूमिका सायमन कमिशन समोर दिलेली साक्ष भारत देशाची घटना लिहून केलेले ऐतिहासिक कार्य धर्मांतर करताना केलेल्या भारत देशाच्या अखंडतेचा विचार या सर्व बाबींचा जर कोणताही पूर्वगृह न बाळगता तटस्थ राहन अभ्यास केला तर डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी तुरुंगात न जाता आदोलनात कोणत्याही आदोलनात सहभाग न घेता स्वातंत्र्याची लढाई लढले नसली तरी वैचारिकदृष्ट्या अभ्यासपूर्णपणे ते ब्रिटिशांसोबत अत्यंत मुत्सद्दीपण थेट भिडत स्वराज्यासाठी लढत राहिले हे कुणालाही नाकारता येणार नाही । इंग्लंडमध्ये झालेल्या तिन्ही गोलमेज परिषदांना डॉ . बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्यांचा पुढारी म्हणून हजर होते अन दुसरीकडे गांधीजी डॉ . बाबासाहेबांना अस्पश्यांचे प्रतिनिधी म्हणन मानायता तयार नव्हते ,गांधीजींचे म्हणणे होते कि मी संपूर्ण भारताचा प्रतिनिधी आहे त्यामुळे अस्पृश्यांचे प्रतिनिधीही मीच आहे डॉ . आंबेडकर नव्हे या वादावर दुसन्या गोलमेज परिषदेचे अधिवेशन गुंडाळले गेले तिसऱ्या गोलमेज परिषदेच्या अधिवेशनाला गांधीजींनी हजर राहून स्वराज्याची लढाई लढणे किंवा अखंड भारताची बाजू मांडणे ही त्यांची जबाबदारी होती असे असतानाही गायाजासह काणताच काँग्रेसचा पढारी तिसऱ्या गोलमेज परिषदेच्या अधिवेशनाला हजर राहिला नाही त्यामुळे हे देशासाठीचे राष्ट्रीय कार्य बजावण्याचे कर्तव्य डॉ . बाबासाहेब आंबेडकराना एकट्याला करावे लागले तिसऱ्या गोलमेज परिषदेच्या अधिवेशनात गांधीजी नेहरू हजर राहिले असते तर सर्व होणान्यांनी अखंड भारताची बाज जर मांडली असती तर भारताचा इतिहास कदाचित फाळणीचा न राहता ऐक्याचा ठरला असता .

डॉ . बाबासाहेबांनी तिसया गोलमेज परिषदेच्या अधिवेशनात भारताचा दर्जा वाढविण्यासाठी ब्रिटिशांसमोर बुद्धिवादाची लढाई केली संपूर्ण भारतासाठी प्रांतात व केंद्रात दोन्ही ठिकाणी जबाबदारीच्या सरकारची मागणी त्यांनी केली . साऊथबरो कमिशन पुढे । बाबासाहेबानी जे निवेदन सादर केले होते त्या मध्ये भविष्यातील भारताच्या लोकशाहीची बीजे होती . अवघ्या पंचविशीत केवढी प्रगल्भता दाखवली होती त्यांनी ! पाच गोया दिग्गज ब्रिटिशांसमोर निभीडपणे मांडलेले मुद्दे इंग्रज अधिकायांच्या ज्ञानात भर पाडतील असे होते आम्ही भारतीय लोक सरकार चालविण्यास सक्षम आहोत असे ब्रिटिशांच्या समोरच त्यांच्याच मायभूमीत ठामपणे मांडले गांधीजींच्या अनुपस्थितीत डॉ . बाबासाहेबांनी मांडलेती स्वराज्याची भूमिका भारताच्या एकात्मतेची होती गोलमेज परिषदेमध्ये डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या प्रभावीपणे बाजू मांडल्यमुळे गांधीजींनी डॉ . बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाले की तुम्हीच खरे देशप्रेमी आहात भारतीयांनी केलेल्या स्वराज्याच्या मागणीनुसार भारतीयांना कसे स्वातंत्र्य हवे याची चर्चा करण्यासाठी सायमन नावाच्या अधिकायाच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमधून शिष्टमंडळ भारतत पाठवले ते सायमन कमिशन होय या कमिशनसमोर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धिवादाने पटवून दिले की भारताला स्वातंत्र्य का दिले पाहिजे याप्रसंगी त्यांनी दिलेली साक्ष ही । भारताच्या भावी राज्यघटनेचाआराखडाच सायमन कमिशनवर सादर केला । सायमन कमिशनवर गांधीजींनी बहिष्कार टाकला पण काँग्रेसच्या काही नेत्यांनी उदाहरणार्थ श्रीनिवास अय्यंगार सत्यमूर्ती स्मुर्ती यांनी सायमन कमिशनला भेटून आपले म्हणणे मांडले काही इतर हिंदू विषयक मुसलमान केसच्या पुढाऱ्यांनी आपापल्या प्रश्रासाठी सायमन कमिशनची भेट घेतली असे असतानाही फक्त डॉ . बाबासाहेबांमुळे सायमन कमिशनला सहकार्य केले असे म्हणणाऱ्या पर्यंत काही नतद्रष्ट लोकांची मजल गेली मुळात डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशन समोर दिलेली साक्ष वाचली किंवा त्यांनो सायमन कमिशनला लेखी सादर केलेले निवेदन वाचली तर भारताला कसे स्वातंत्र्य हवे याची घटनात्मक दृष्टीने बाजू मांडल्याचे लक्षात येइल . आता विचार करा ज्याच्या साम्राजाचा सूर्यच कधी मावळत नव्हता असे म्हणतात त्या बलाढ्य ब्रिटीशांच्या समोरच उभे राहून स्वातंत्र्याची थेटपणे निडरपणे मागणी । करते ती व्यक्ती देशप्रेमी देशभक्त स्वातंत्र्यप्रेमी नाही तर काय आहे ? इंग्लंडमध्ये झालेल्या गोलनेजपरिषदेमध्ये स्वराज्याच्या भूमिकेबरोबर अस्पृश्यांच्या प्रथांची चर्चा डॉ . बाबासाहेब आंबेडकरांमुळे झाली ब्रिटनचे प्रधानमंत्री यांना त्यांनी सविस्तर । निवेदनही दिले स्वातंत्र्यापूर्वी या देशात ६०१ संस्थानिक होते हे संस्थानिक स्वतःला भारतीय । म्हणत असले तरी आपल्या संस्थानला मात्र ते स्वतंत्र देश मानत असत याचा अर्थ स्वातंत्र्यापूर्वी । भारतात सहाशे देश नांदत होते . डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी संस्थानांच्या विलीनीकरणासाठी कायदामंत्री असताना जी । मेहनत घेतली त्याकडे कोणालाही दुर्लक्ष करता येणार नाही संस्थाने स्वतंत्र असतील तर भारत । एकसंघ राहिला असता काय याचा विचार स्वातंत्र्यासाठी बाबासाहेब तुरुगात गेले होते काय असा प्रश्न विचारण्याने जरूर करावा संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रशू तत्कालीन गृहमंत्री । वलभभाई पटेल यांच्या भूमिकेचा इतिहास दखल घेतो त्यासाठी त्यांना लोहपुरुषाची उपमा दिली । जाते.

हैदराबादचे संस्थान भारतात देऊ नये त्याला स्वतंत्र उर्जा मिळावा यासाठी निजामाने केलेला आलापिटा लात घेतला तर संस्थानाच्या विलीनीकरणाचा प्रण कदाचित आंतरराष्ट्रीय बनला असता नव्हे निजामाने सत्कालीन राष्ट्र संघात जाऊन तसा प्रयत्नही काला , परत बॅरिस्टर डॉ बाबासाहेब आंबेडकर या देशाचे वायदेमंत्री होते त्यांनी संस्थानामा लष्कर घुसवण्याचा ऐवजी पोलिस अॅक्शन असा पर्याय दिला ज्यामुळे संस्थानांचे विलीनीकरण हा भारताचा अंतर्गत मामला बनला आणि केवळ तीन दिवसांत निजामाला शरण यावे लागन आज हैदराबाद या देशाच्या नाभीस्थळावर जर निजामाचा झेहा राहिला असता तर स्वतंत्र आणि सार्वभौम भारताच्या अस्तित्वालाच कितीदा धक्के बसले असते याची कल्पनाच पुरेशी आहे . जम्मू काश्मीरच्या विलीनीकरणाची करण्यासाठी घातलेला घोळ आणि या प्रशान देशाच्या एकात्मतेवर घातलेला घाला लक्षात घेतला तर डॉ . बाबासाहेबांची पोलिस एक्शन ही या देशाजर एक फार मोठे प्रकार होते हे मान्य करण्याशिवाय पर्याय राहत नाही स्वतंत्र भारताची राज्यघटना देण्याची जबाबदारी डॉ बाबासाहेब आंबेडकरांवर टाकण्यात आली प्रकृती स्वास्थ्य ठीक नसताना घटना समितीतील बहुतांश सदस्यांचे सहकार्य नसतानाही जगातील सर्व घटनांचा अभ्यास करून भारत देशाला एकसंध ठेवणारी राज्यघटना लिहून देशावर असणारे प्रेम व्यक्त केले घटना समितीतील शेवटचे भाषण करताना डॉ . आबेडकर म्हणाले माझ्या शरीरात शेकाव्या रक्ताचा थेव असेपर्यंत मी देशाच्या एकात्मतेसाठी काम करीन असे म्हणनारे डॉ . बाबासाहेब आंबेडकर किती सच्चे देशप्रेमी देशभक्त स्वातंत्र्यप्रेमी होते हे लक्षात येते .

 लेखक :- अरविंद साधने 
(इतिहास अभ्यासक आहेत )
जागल्या या पुस्तकातून 

संकलन 
बुद्धभूषण गवई
www.ambedkarmovement.com
(डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे देशाप्रती कार्य न मोजण्या इतके आहे, आपणही अश्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर लिखाण करत असाल तर ते लेख या वेबसाईटवर टाकायचे असल्यास bhushangawai143@gmail.com यावर संपर्क करा)
Previous article
Next article

1 Comments

  1. लेखामधे काही भाग पुन्हा copy झालेला आहे, बाकी छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel